न सुटणाऱ्या समस्या दाखवणारं बाळासाहेबांचं हे व्यंगचित्रं.. आजही भाववाढ होतेच आणि अनेकांचा भूकबळी जातो. यावर भाष्य करणारं हे व्यंगचित्र आजही लागू होतं, नाही का?
निवडणुकांमध्ये प्रचाराचे मुद्दे आणि मतदारांचे प्रश्न आजही भ्रष्टाचार, बेकारी, गरिबी, टंचाई, महागाई हेच आहेत. बाळासाहेबांचं हे व्यंगचित्र आजही १००% लागू होतं.
अन्यायाविरुद्ध आणि राष्ट्रदोहाविरुद्ध “मार्मिक”चा आसूड आजही कडाडतोच आहे.
“काँग्रेसवरील संक्रांत” यापेक्षा कोणती उपमा आज अध्यक्षाच्या शोधात असलेल्या काँग्रेसला मार्मिक टोला असेल?
बाळासाहेबांनी या व्यंगचित्रात दाखवलेला जातीयवादाचा रावण आजही समाजासमोर आव्हान म्हणून उभा आहे.
आजही अनेकदा गरिबी हटाव अशी वरवर घोषणा देणाऱ्या नेत्यांचे शाही दौरे होतात. यावर भाष्य करणारं बाळासाहेबांचं हे व्यंगचित्र.
मुंबईतल्या गिरणी कामगारांचे अनेक प्रश्न आजही सुटलेले नाहीत.