सलग सात-आठ दिवस पडणाऱ्या पावसामुळे कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पूरचा कहर दिसून आला. गेल्या आठवडाभर पाणी ओसरण्याचे नाव घेत नव्हते. राज्यात पुराचे आतापर्यंत ४३ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापुरात परिस्थिती अधिक वाईट आहे.
येथे चारही ठिकाणी केवळ पाणी दिसून येत आहे. एनडीआरएफ, भारतीय नौदल, हवाई दल आणि लष्कराचे सैनिक लोकांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. तसेच आता मदत कार्याला वेग आला आहे. दरम्यान, पुणे-बंगळूर महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. त्यामुळे गेले आठ दिवस ठप्प असलेली वाहतूक सुरु झाली आहे.
या पुरातून वाहून गेलेले तीन जण अद्याप बेपत्ता आहेत. ५८४ गावातील ४ लाख ७४ हजार २२६ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. विस्थापित झालेल्या लोकांसाठी ५९६ तात्पुरते निवारा शिबिर स्थापन करण्यात आले आहेत.