शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे जर मुख्यमंत्री झाले तर बीड जिल्हयातून तिरुपतीच्या दर्शनाला पायी प्रवास करेल असा नवस शिवसैनिक सुमंत रुईकर आणि श्रीधर जाधव या दोघांनी केला होता. आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झल्यावर या दोघांनी नवस फेडण्यासाठी बीड जिल्हयातून तिरुपती बालाजीकडे पायी प्रवास चालू केलेला आहे . या शिवसैनिकांचा ठिकठिकाणी सत्कार करण्यात येत आहे.
बीड येथील शिवसैनिक सुमंत रुईकर आणि श्रीधर जाधव यांनी विधानसभा निवडणुका झाल्यावर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले तर बीड ते तिरुपती बालाजी मंदिर पायी प्रवास करेल असा नवस केला होता. त्यांचा हा नवस पूर्ण झाला असून ५ डिसेंबर रोजी ते बीड जिल्ह्यातून तिरुपती बालाजीकडे निघाले आहे. बीड मध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांच्यासह शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत त्यांनी आपल्या प्रवासाला सुरवात केली आहे.