हे तर गलिच्छ राजकारण, पण मी संयम बाळगलाय – आदित्य ठाकरे

Aditya-Thackeray-aarey-phot_f/राजकारण

हे तर गलिच्छ राजकारण, पण मी संयम बाळगलाय – आदित्य ठाकरे

सध्या राज्य कोरोनाच्या संकटाने चिंतीत झालेला असताना दुसरीकडे सिने-अभिनेता सुशांतसिह राजपूत याच्या आत्मेहत्येच राजकारण करत विरोधी पक्ष आघाडी सरकारला अडचणीत आणण्याचा अतोनात प्रयत्न करत आहे. तसेच या प्रकरणात मंत्री आदित्य ठाकरे यांचा काडीमात्र संबंध नसताना विरोधकांनी विनाकारण मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव या प्रकरणात गुंतवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

या प्रकरणात राज्य सरकारने मुंबई पोलिसांवर पूर्णपणे विश्वास ठेवत हे प्रकरण मुंबई पोलिसांकडे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ह्या प्रकरणात राजकारण करत विरोधी पक्षाने हे प्रकरण CBI कडे देण्याचा हट्ट धरला आहे. म्हणूनच कुठेतरी आघाडी सरकारच्या मंत्र्यांचे नाव यात गुंतवण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करताना दिसत आहे

मात्र याच प्रकरणावर आज मंत्री आदित्य ठाकरे यांनी पत्रक काढून विरोधकांना उत्तर दिले आहे. या पत्रकात सुशांतसिह राजपूत याच्याशी माझा काडीमात्र संबंध नाही असे स्पष्टीकरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, मी हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा नातू म्हणून सांगू इच्छितो की, महाराष्ट्राच्या, शिवसेनेच्या आणि ठाकरे कुटूंबियांच्या प्रतिष्ठेला तडा जाईल असे मी कृत्य कदापि करणार नाही तसेच फालतू आरोप करणाऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे. या प्रकरणाची कुणाकडे काही विशेष माहिती असेल तर त्यांनी त्वरित पोलिसांना द्यावी असे आवाहन सुद्धा मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here