राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्नांची संख्या ५ लाखांच्यावर पोहचलेली आहे. आज दिवसभरात राज्यात
एकूण ९ हजरांच्यावर रुग्ण कोरोनमुक्त झाल्याची बातमी आरोग्य खात्याकडून देण्यात आलेली आहे. त्यामुळे हे राज्यातील आरोग्य खात्याचे मिळवलेले मोठे यशच म्हणावे लागणार आहे. तर गेल्या २४ तासात १४ हजारांच्यावर नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे.
आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात आतापर्यंत ३८ लाख ६२ हजार १८४ नागरिकांची कोरोना चाचणी झालेली असून त्यापैकी ७ लाख ३३ हजार ५६८ जणांना कोरोनाची लागण लागली आहे. सध्या राज्यात १ लाख ७८ हजार २३४ कोरोना रुग्ण उपचार घेत आहे.