राजकारण करण्यासाठी भाजपाचे घंटानाद आंदोलन, शिवसेना नगरसेवक दिपेश म्हात्रे यांची टीका

भाजपाचा-मंदिर-उदघडण्याचा- BJP-temple-opening

कोरोनाच्या वाढत्या पाश्वभूमीवर मागील अनेक दिवसापासून बंद असलेली मंदिरे पुन्हा खोलण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे संपूर्ण महाराष्ट्रात घंटानाद आंदोलन सुरु करण्यात आले आहे. कल्याण डोंबिवली येथे सुद्धा असेच घंटानाद आंदोलन सुरु करण्यात आले आहे. या आंदोलनावर आता कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी टीका केली आहे.

कोरोना प्रादुर्भाव काळात जेव्हा कल्याण डोंबिवलीत रुग्णांना बेड, आयसीओ, ऑक्सिजन मिळत नव्हते, जेव्हा नागरिकांना गरज होती तेव्हा ही मंडळी कुठे होती. फक्त राजकारण करण्यासाठी घंटा नाद आंदोलन केलं गेलं आहे, असा आरोप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here