सिने-अभिनेत्री कंगना रानौत हिने मुंबई आणि मुंबई पोलिसांबाबत केलेल्या वक्तव्यावरून सामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट पसलेली आहे. अनेकांनी तिच्या या विधानाचा निषेध व्यक्त केला होता. आता त्यापाठोपाठ शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सुद्धा संताप व्यक्त करत कंगना रानौतला खडेबोल सुनावले आहे.
कंगना मुंबईत आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडतील, असा इशारा आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. तसेच कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. हा इशारा त्यांनी आपल्या ट्विटरवरून हा इशारा दिला आहे.
पुढे बोलताना सरनाईक म्हणाले की, ती इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा देतानाच उद्योजक व सेलेब्रिटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनावर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांकडे मागणी करणार आहे, असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.