Skip to content Skip to footer

‘आमची मुंबई आणि आमचे मुंबईकर ह्या मुंबईद्रोही लोकांना विसरणार नाही !’ – युवासेना सचिव वरूण सरदेसाई.

‘आमची मुंबई आणि आमचे मुंबईकर ह्या मुंबईद्रोही लोकांना विसरणार नाही !’ – युवासेना सचिव वरूण सरदेसाई.

सिनेअभिनेत्री कंगना रानौत हिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करून अंगावर नवीन वाद ओढवून घेतला आहे. तिच्या या वक्तव्याचे समर्थन करत भाजपा आमदार राम कदम यांनी तिला ‘झाशीची राणी’ ही उपमा देऊन टाकली होती. मुंबईची पाकिस्तान बरोबर तुलना करून सर्व मुंबईकरांचा राग कंगनाने आणि भाजपा नेत्यांनी अंगावर ओढावून घेतला आहे, असे चित्र संपूर्ण राज्यात दिसत आहे.

यावर आता युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांनी ट्विट करत कंगना आणि तिच्या समर्थानात उतरणाऱ्या भाजपाला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. “आधी मुंबई पोलिसांना शिव्या, आता थेट आपल्या मुंबई शहराला पाक व्याप्त काश्मीर म्हणणार हे लोकं ?? वाईट ह्याचे वाटते की, असल्या लोकांना मुंबईतील भाजप नेते झाशीची राणी म्हणतात ?? बिहार निवडणुका येतील आणि जातील पण आमची मुंबई आणि आमचे मुंबईकर ह्या मुंबईद्रोही लोकांना विसरणार नाही !, असे ट्विट त्यांनी केले आहे.

काही दिवसांपूर्वी राम कदम यांनी कंगनाला या सरकारने संरक्षण द्यावे असे ट्विट केले होते. या ट्विटला रिट्विट करत कंगनाने मुंबई पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हिमाचल पोलीस किंवा केंद्रीय पोलिसांच्या संरक्षणाची मागणी केली होती. याविरोधात संपूर्ण मुंबईतुन कंगना आणि तिचे समर्थन करणाऱ्या राम कदम यांच्या विरोधात संतापाची लाट पसरली होती.

Leave a comment

0.0/5