सिनेअभिनेत्री कंगना रानौत हिने मुंबई पोलीस आणि मुंबईवर केलेल्या भाष्यामुळे सर्व स्थरातून तिच्या विरोधात संतापात प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. त्यातच आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुद्धा मोठे विधान केले आहे. “एखाद्याला मुंबईत सुरक्षित वाटत नसेल तर त्यांना मुंबईत तसंच महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही. तसेच एखाद्या कलाकाराने अशा प्रकारचं वक्तव्य करणं हास्यास्पद आहे,” ते मुंबई पत्रकार माध्यमांशी बोलत होते.
मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांची तुलना स्कॉलटंडशी होत असते. अतिशय सक्षमपणे मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस काम करत असतात. अशा परिस्थितीत एखाद्या कलाकाराने अशा प्रकारचं वक्तव्य करणं हास्यास्पद आहे. आज मुंबई तसंच महाराष्ट्र पोलिसांच्या हाती मुंबईत सुरक्षित आहे, असे ही कौतुकास्पद उदगार अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिसांसाठी काढले होते.