देशात सरकारी बँकांचे होणार खाजगीकरण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सूचक विधान

सरकारने सर्वच क्षेत्रात असण्याची गरज नसल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीं केले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेपर्यंत केंद्र सरकारच्या जनधन किंवा पीएम किसान योजना तसेच इतर योजना पोहचवण्याचे महत्वपूर्ण काम करणाऱ्या सरकारी बँकांचे लवकरच खजगीकरण होण्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, केंद्र सरकारने सर्वच क्षेत्रात असण्याची गरज नाही. व्यवसाय करणे हे सरकारचे काम नाही तर व्यवसायाला सहकार्य करणे ही सरकारची भूमिका असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी एका कार्यक्रमात सहभागी झालेले असताना बोलून दाखविले होते.

मात्र जर केंद्र या सरकारी बँका सरकारच्या महत्वपूर्ण योजना या सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याचे काम करत असतात. या सरकारी बँकांचे जर खासगीकरण केले तर केंद्र आणि राज्य सरकारच्या या योजना सर्वसामान्यांपर्यंत कशा पोहचणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here