महाराष्ट्र बुलेटिन : शिवसेना चर्मोद्योग कामगार सेनेमार्फत केल्या जाणाऱ्या अथक प्रयत्नांना अखेर यश आले असून जवळपास ४३ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या प्रधान कार्यालयाची इमारत देवनार येथे दिमाखाने उभी राहणार आहे.
विशेष म्हणजे संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे कार्यालय उभारणीसाठी १९७८ सालीच प्रशासनाकडून देवनार येथे भूखंड देण्यात आलेला आहे,…
औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करणार का? आदित्य ठाकरे म्हणतात की.
सध्या औरंगाबादचे संभाजीनगर नामांतरावरून राजकारण चांगलेच तापू लागले आहे. त्यात आज विविध विकासकामांच्या शुभारंभासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे संभाजीनगर शहरात दाखल झाले असता त्यांना पत्रकारांनी औरंगाबाद नामांतरावरूनच प्रश्न विचारला होता.
यावर पाहिल्यादा बोलताना मंत्री आदित्य ठाकरे यांनी सूचक प्रतिक्रिया दिलेली आहे. पुढे पुढे पाहा काय होतंय..! महाविकास आघाडीचे…
औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीची ताकद आणि संघटन वाढवून येणाऱ्या ग्रामपंचायत आणि महापालिका निवडणुकीत चमकदार कामगिरी करण्यासाठी औरंगाबादचे संपर्कमंत्री म्हणून राजेश टोपे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापुर्वी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे ही जबाबदारी होती. आगामी महापालिका व ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा बदल महत्वाचा समजला जातोय. संपर्कमंत्री म्हणून टोपे यांनी महिन्यातून किमान एक बैठक घेऊन त्याचा अहवाल…
गारपिटीचा औरंगाबाद जिल्ह्यात फटका बसण्याची शक्यता
मागील तीन ते चार दिवसांपासून वातावरणातील सुरु असलेला बदल पुढील ४८ तास म्हणजेच आणखी दोन दिवस कायम राहणार आहे. तसेच अरबी समुद्रातील सक्रिय असलेल्या चक्रीवादळाचा परिणाम औरंगाबाद जिल्ह्यावरही होत आहे. त्यामुळे दोन दिवसात काही जिल्ह्यांतील काही भागांमध्ये गारपिटीची शक्यता
हवामान तज्ज्ञानी वर्तवली आहे. त्यानुसार औरंगाबादेतही गारपीटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
डिसेंबर महिना…
गुन्हा दाखल करण्याची महिलेची मागणी
एखादी व्यक्ती त्रास देत असेल किंवा मानसिक छळ देत असेल म्हणून महिलेने पोलिसांकडे तक्रार केल्याचं याआधी तुम्ही ऐकलं असेल. पण औरंगाबादमध्ये महिलेने चक्क रस्त्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. यामुळे पोलीसही चक्रावले आहेत. मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास व्हावा म्हणून रस्ता आपली अडवणूक करत असल्याचं महिलेने तक्रारीत म्हटलं आहे.
संध्या घोळवे-मुंडे…
...तर पंधरा दिवस दुकान बंद ठेवावे लागणार ; औरंगाबाद महानगरपालिकेचा निर्णय
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वाढत असताना तसेच वाढती गर्दी पाहता औरंगाबाद महानगरपालिकेने ठोस पावले उचलायला सुरुवात केली आहे. औरंगाबाद शहरात अनेक ठिकाणी गर्दी नियमित पणे वाढलेली दिसून येत असल्याने पालिकेने खबरदारीचे उपाय म्हणून काही नियम जारी केले आहेत.
त्यामध्ये प्रामुख्याने दुकानदारांसाठी काही कडक निर्बंध घालण्यात आले…
भाजपा आमदार प्रशांत बंब यांच्यावर फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल?
औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर मतदारसंघाचे भाजपा आमदार प्रशांत बंब यांच्यावर बनावट दस्तऐवज खरा असल्याचे भासवून गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांची १५ कोटी ७५ लाख ३३ हजार ३३८ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात बंब यांच्यासह १६ जण आरोपी आहेत.
कृष्णा पाटील डोणगावकर…
सन 2023 मध्ये ‘हयात प्लेस औरंगाबाद एअरपोर्ट’ सुरू होणार, 5 हजार जणांना मिळणार रोजगार
जगातल्या ५७ देशांत ५०० हॉटेल असणारे “हयात हॉटेल कॉर्पाेरेशन’ औरंगाबादमध्ये पाऊल ठेवणार आहे. डीएमआयसी, ऑरिक सिटी, स्मार्ट सिटीवर नजर ठेवत हा समूह चिकलठाणा परिसरात २०२३ पर्यंत “हयात प्लेस औरंगाबाद एअरपोर्ट’ सुरू करणार आहे. १५७ खोल्यांच्या हॉटेलमध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा असतील. सध्या…
औरंगाबादमध्ये ढगफुटीच्या व्हायरल बातम्यांमुळे भीतीचे वातावरण
संपूर्ण महाराष्ट्रात परतीच्या पावसामुळे हाहाकार माजलेला दिसून येत आहे. त्यातच मुंबई, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात ही पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद मध्ये मागच्या तीन दिवसांपासून धुवांधार पाऊस सुरू आहे.
जिल्ह्याच्या काही ग्रामीण भागात या पावसामुळे अतोनात हाल होत असून, शेती व ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत होत असल्याचे…
नागरिकांना स्वच्छ, शुद्ध पाणी पुरवठा योग्य प्रमाणात होईल, याची खबरदारी घ्यावी! - सुभाष देसाई
औरंगाबाद जिल्ह्यात सध्या मुबलक प्रमाणात पाणीसाठा झालेला आहे. सर्व पाणीसाठे, प्रकल्प सरासरी ९८% भरलेले आहेत. टंचाई काळात पाण्याची कमतरता उद्भवू नये यासाठी सर्व यंत्रणांनी योग्य नियोजन करावे, या संदर्भात काल उद्योग मंत्री, औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे…