झी मराठी वाहिनीवर दाखवण्यात येणाऱ्या स्वराज रक्षक संभाजी महाराज मालिका सध्या खूप गाजत आहे. परंतु ही मालिका आता वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या अटके नंतरचे भाग दाखवू नये अशी मागणी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी केलेली आहे. इतिहास लपवता येत नाही परंतु छत्रपती संभाजी महाराजांचा छळ करून ज्या यातना दिल्या जात आहे हे शिवप्रेमींना पाहणे सहन होणार नाही त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची भीती खोतकरांनी व्यक्त केली आहे.
“स्वराज्य रक्षक संभाजी महाराज ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. राजकीय दबावापोटी ही मालिका बंद करण्यात येत असल्याच्या चर्चा होत होत्या परंतु यावर खुद्द खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी स्पष्ठीकरण दिले होते.