मुंबईच्या ड्रेनच्या क्षमतेपेक्षा चौपट पाऊस झाला आहे. नाल्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त पाऊस झालेला असल्याने मुंबईत अशी परिस्थिती झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे नालेसफाई झाली नाही असे म्हणणे चुकीचे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबईत गेले दोन दिवस सातत्याने कोसळणाऱ्या पावसानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेच्या आपाातकालीन विभागात हजेरी लावली. मुंबईतील परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर बोलताना त्यांनी मुंबईत अशी स्थिती का निर्माण झाली याची माहिती दिली.