उद्धव ठाकरे ह्यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यावर ते शिवनेरी गडाच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच शिवनेरी गडाचा दौरा करणार असल्याने या दौऱ्याला विशेच महत्त्व प्राप्त झाले आहे. या निमित्ताने ते शिवनेरीवरुन शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्याची घोषणा करण्याची शक्यतादेखील वर्तविण्यात येत आहे. हा दौरा ऐतिहासीक ठरावा म्हणुन कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास ही भेट शरद पवार यांच्या वाढदिवशी शेतकऱ्यांना मिळणार आहे.
- Advertisement -