एकीकडे देशावर कोरोना रुपी मोठे संकट आलेले असताना भाजपा नेते सध्या आपल्या नेत्यांची चमचेगिरी करतानाच दिसून येत आहे. परंतु टीका करताना आपण एका महिलेच्या चरित्र्यावर शिंतोडे तर उडवत नाही इतकी समज सुदधा भाजपा नेत्यांना उरलेली दिसून येत नाही. महिलांवर टीका आणि अत्याचार करने हितर भाजपाची संस्कृती आहे असंच आज पर्यंतच्या भाजपा नेत्यांच्या वागण्यावरून आणि बोलण्यातून दिसून आलेच आहे.
एका महिलेच्या ट्विटला कोणत्या भाषेत उत्तर द्यावे याचे दर्शन आज विजयराज जाधव यांच्या ट्विटरवरून दिसून आले होते. जे स्वतः भाजपा नाशिकचे जिल्हाध्यक्ष आहे. प्रकरण असे की वरीष्ठ पत्रकार रश्मी पुराणिक यांच्या “थाळी बाजाव नंतर लोक काय दिवे लावतील याचा विचार पण भयावह आहे संकट काय सुरुये काय…
“असे ट्विट केले होते. पुराणिक यांनी सरळ सरळ मोदी यांच्या मेणबत्ती आणि दिवे पेटवण्याच्या संकल्पनेवर प्रश्न उपस्थित केला होता. या ट्विटला उत्तर देताना “तुम्हाला दिव्यांची भीती वाटायला लागली, तुमचे अंधारतले उद्योग उघड होतील वाटते ! रात्री कोणाच्या बंगल्यावर जात ते कळेल का? पण घाबरू नका आम्ही सांगणार नाही कुणाला? अशा खालच्या पातळीची टीका जाधव यांनी पुराणिक यांच्यावर केली होती. यावर आता महिलांचा सम्मान राखण्याच्या बाता करणारे भाजपा नेते काय कारवाही करणार हे पाहावे लागेल.