ऊसतोड कामगारांना ठाकरे सरकारचा दिलासा – ऊसतोड कामगार स्वगृही परतणार.
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात लॉक डाऊनचे अतिशय काटेकोरपणे पालन केले जात असून, सुरक्षेच्या कारणस्तव सर्व जिल्ह्यांच्या सीमा तसेच गावांच्या सीमा देखील बंद करण्यात आलेल्या आहेत. याचदरम्यान अनेक ऊसतोड कामगार कारखान्यांमध्ये व आसपासच्या गावांमध्ये अडकले असल्याची माहिती समोर आली होती.
यावर सर्व साखर कारखाने व कामगार संघटनांनी मागणी केली असता, ठाकरे सरकारने यावर आज निर्णय घेऊन राज्यभरातील सर्व ऊसतोड कामगारांना घरी जाण्याची मुभा देण्यात आली. याबाबत विशेष पत्रक जाहीर केले आहे.
या कठीण काळात ऊसतोड कामगारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून, त्यांना कौटुंबिक समस्या देखील उद्भवत आहे. परंतु ठाकरे सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील सर्व ऊसतोड कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे.