लोकनेते राजारामबापू पाटील महाराष्ट्रासाठी दिशादर्शक आहे ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
लोकनेते राजारामबापू पाटील जन्मशताब्दी समारोह कार्यक्रम आज विधानभवन येथे आयोजित केला होता. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, ‘राजारामबापू हे अतिशय स्वच्छ व चारित्र्यवान नेतृत्व होते. त्यांचा काळ पाहिला असता असे लक्षात येते की, ती पिढी कर्तृत्ववान व नशिबवान आहे. दिग्गज मंडळी आजूबाजूला असल्यामुळे ते नशिबवान तर कार्य कर्तृत्वाने घडत गेल्यामुळे कर्तृत्ववान !’, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी व्यक्त केली.
‘आज राजाराम बापू नुसते घडले नाही तर त्यांनी पिढी घडवली. लोकनेते, पदयात्री असलेल्या राजारामबापू यांनी केलेल्या कार्यामध्ये मजूर वर्ग, शेतकरी, उद्योग, सर्वसामान्य अशा सर्वांच्या विकासाचा समावेश आहे. त्यांचाच वारसा लाभलेले जयंतराव पाटील माझे सहकारी असल्याचा अभिमान वाटतो’, असेही मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी सांगितले.