५ वर्ष ज्यांनी गृहखाते सांभाळले, तेच आज मुंबई पोलिसांवर संशय व्यक्त करतात….!

५ वर्ष ज्यांनी गृहखाते सां-5 years for those who

५ वर्ष ज्यांनी गृहखाते सांभाळले, तेच आज मुंबई पोलिसांवर संशय व्यक्त करतात….!

“पाच वर्ष ज्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री पद सांभाळले तेच आज मुंबई पोलिसांवर संशय व्यक्त करतायंत, सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ते राजकारण करतात”, अशी घणाघाती टीका कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. आज नगर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी ध्वजारोहण केले. यावेळी नगर जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी तसेच प्रशासकीय अधिकारी सुद्धा उपस्थित होते.

‘सुशांतसिंह राजपूत या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली होती आणि आता त्यांना बिहारचे प्रभारीपद दिले जात आहे, हे सर्व पाहता या प्रकरणात राजकारणच आहे, असे इतर नेत्यांना सुद्धा वाटत आहे. पाच वर्षे ज्यांनी स्वतः गृहखाते सांभाळले तेच पोलिसांवर संशय व्यक्त करतात ही दुर्दैवी गोष्ट आहे’, असा चिमटा सुद्धा मुश्रीफ यांनी फडणवीसांना काढला होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here