औरंगाबादेत शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी आमदार अंबादास दानवेंनी केली कृषी केंद्रांची पाहणी.

औरंगाबादेत शेतकऱ्यांच्य-Farmers in Aurangabad

औरंगाबादेत शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी आमदार अंबादास दानवेंनी केली कृषी केंद्रांची पाहणी.

आज औरंगाबादेतील चिकलठाणा परिसरात आमदार अंबादास दानवे यांनी श्री शिवनेरी कृषी सेवा केंद्राला भेट देऊन दुकानदाराशी चर्चा केली. खरीप हंगामासाठी पेरणीसाठी आवश्यक असलेल्या बियाणे, खतांची उपलब्धता माहिती जाणून घेत येथे उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांसोबत ही संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. कोरोनाच्या या काळात लॉक डाउन लागू असल्यामुळे शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे समाजातच स्वतःहून पाहणी करण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी सांगितले.

या भेटीदरम्यान मला चांगला अनुभव आला तसेच शेतकऱ्यांनी माझ्याकडे समाधान व्यक्त केले. अशाच प्रकारे शिवसैनिकांनीही गावोगावी जाऊन कृषी केंद्राला भेट देऊन पाहणी करावी आणि शेतकऱ्यांना जर काही अडचण आल्यास सोडवाव्यात! , असे आवाहन अंबादास दानवेंनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here