औरंगाबादेतील व्यापाराबाबत ठेवण्यात आलेली अट हटवण्यात आली ! – १० ते १८ जुलै कडक लॉक पाळला जाणार !

औरंगाबादेतील व्यापाराबा-Vyaparaba in Aurangabad

औरंगाबादेतील व्यापाराबाबत ठेवण्यात आलेली अट हटवण्यात आली ! – १० ते १८ जुलै कडक लॉक पाळला जाणार !

आज औरंगाबाद मध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आला घालण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात कठोर पावला उचलण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. त्यानुसार संपूर्ण औरंगाबादमध्ये १० जुलै ते १८ जुलै कडक लॉक डाउन व संचार बंदीचे आदेश प्रशासनाकडून जारी करण्यात आले आहे. परंतु त्यापूर्वी व त्यानंतर व्यापार करण्यासाठी मुभा देण्यात यावी अशी मागणी व्यापारी संघाकडून करण्यात येत होती. आज झालेल्या विभागीय आयुक्त मनपा आयुक्त, पोलिस कमिशनर व जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त बैठकीमध्ये महासंघाच्या मागणीनुसार P1/P2 ही व्यापारी बांधवांसाठी अडचणीची ठरणारी अट रद्द करण्यात आली आहे.

त्यानुसार सम विषम तारखांना व्यापार सुरु करण्यास मुभा देण्यात आली आहे. तसेच शहरातील वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी पुकारलेल्या ८ दिवसीय लॉक डाउनला व्यापारी संघाने पाठिंबा जाहीर केला असून, त्यानिमित्ताने व्यापारी संघाने सामाजिक भान दर्शविले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here