Skip to content Skip to footer

राज्यमंत्री मंडळाचा विस्तार राष्ट्रवादीच्या दोन तर काँग्रेसच्या एका नेत्याला स्थान ?

लोकसभा निवडणुकीच्या निकाला नंतर लगेच राज्यमंत्री मंडळाचा विस्तार होण्याचे चिन्ह सध्या दिसून येत आहे. तशा चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. पुढल्या महिन्यात ५ ते १० जून दरम्यान राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या संदर्भातील सर्व निर्णय लोकसभा निवडणुकीच्या २३ मेच्या निकालावर अवलंबून आहे. या मंत्री मंडळाच्या विस्तारात राधाकृष्ण विखे पाटील, विजय सिंह मोहिते-पाटील आणि जयदत्त क्षीरसागर यांची वर्णी लागू शकते.

विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते पाटील आणि राष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर यांनाही राज्य मंत्रिमंडळात समावेश करुन घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे, या तिघाही नेत्यांनी त्यांच्या आताच्या पक्षांचे राजीनामे दिले नाहीत. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असलेल्या या नेत्यांना भाजपा गळाला लावण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्य मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर शिवसेना सत्तेत सहभागी झाली आणि त्यानंतर विस्तार झाला होता. मात्र, त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशा फक्त चर्चा झाल्या. मात्र, प्रत्यक्षात मंत्रिमंडळाचा विस्तार झालाच नाही. अखेर लोकसभा निवडणुकीनंतर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे.

Leave a comment

0.0/5