लोकसभा निवडणुकीच्या परभवानंतर जिथे इतर नेते फक्त पराभवाची कारणे शोधत बसतात तिथे माजी खासदार पाटील यांनी नवा आदर्श निर्माण केलेला आहे. त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. राष्ट्रीय कृषी उच्चाधिकारी समितीने रसायनमुक्त शेतमाल उत्पादन आणि निर्यातीसाठी जुन्नर किंवा भीमाशंकर येथे विशेष क्लस्टर उभारण्याची शिफारस निती आयोगाला करावी, अशी मागणी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि शिवसेनेचे उपनेते यांनी उच्चाधिकार समितीचे निमंत्रक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर या शेतीप्रधान तालुक्यांचा समावेश आहे. हा प्रदेश निसर्ग आणि शेती समृद्ध असून, शेतकरी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातुन निर्यातक्षम फळे भाजीपाल्याचे उत्पादन घेत आहे. या प्रदेशातील बहुतांश भाजीपाला हा मुंबईसह देशाच्या विविध भागात पाठविला जात आहे. निती आयोगाने सुचविल्याप्रमाणे शेतीमध्ये खासगी आणि परकीय गुंतवणुक वाढीसाठी शेती क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देणे गरजेचे आहे. अशी मागणी खा. शिवाजीराव अढळराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे.