लोकसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवत केंद्रात सत्ता स्थापन केली. त्यानंतर केंद्रीय मंत्री म्हणून नितीन गडकरी यांची पुन्हा एकदा निवड झाली आहे. अशातच संभाजी नगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी गडकरी यांच्या कामाची स्तुती केली आहे. त्यामुळे सतत भाजपा आणि आरएसएस विरोदहत बोलणाऱ्या वंचितच्या द्राक्ष माबेडकर आणि एमआयएम खासदार ओवेसी यांना घरचा आहेर मिळाला आहे. असेच म्हणावे लागेल.
इम्तियाज जलील यांनी सभागृहात बोलताना, केंद्रीय मंत्री म्हणून देशात सर्वात चांगले काम जर कुणी करत असेल तर ते नितीन गडकरी आहेत. मी विरोधी पक्षाचा खासदार असलो तरी त्यांच्या हेतूवर शंका घेतली जाऊ शकत नाही. पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे हे गडकरींच्या चांगल्या कामाचे एक उदाहरण आहे. त्याचे श्रेय जर कुणाला जात असेल तर ते फक्त गडकरीनांच अशा शब्दात गडकरी यांच्या कामाचे कौतुक केले. त्यामुळे आता विरोधक सुद्धा युती सरकारच्या कामगिरीची प्रशंसा करताना दिसत आहे.