मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली “महाजानदेश यात्रा” सातारा जिल्ह्यात पोहचली. आज ही यात्रा सांगलीकडे रवाना होणार आहे. तत्पूर्वी कराड येथे झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणांना त्यांच्याच जिल्हयात जाऊन थेट प्रश्न विचारला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना माझा प्रश्न आहे, तुम्ही ३७० च्या विरोधातले की बाजूचे? तुम्ही भारताच्या बाजूचे की नाहीत?, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी पृथ्वीराज चव्हाणांना विचारला.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की महाराष्ट्र उद्योगात आठव्या क्रमांकावरुन तेराव्या क्रमांकावर गेला. ही आकडेवारी कुठून आणली माहिती नाही. आकडेवारी दिली नाही असे ते म्हणतात, पण सगळी आकडेवारी केंद्र सरकारच्या वेबसाईटवर आहे. त्यांच्या काळात महाराष्ट्र आठव्या क्रमांकवर गेला ही त्यांनी कबुली दिली.