राष्ट्रवादीचे घड्याळ बंद पडलंय, त्यांना मतदान करून ‘घाटे का सौदा’ करु नका

राष्ट्रवादीचे-घड्याळ-बंद-Nationalist-clock-close

राष्ट्रवादीचे घड्याळ बंद पडलंय, त्यांना मतदान करून ‘घाटे का सौदा’ करु नका – स्मृती इराणी
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना महाराष्ट्रात प्रचारासाठी आलेल्या केंद्रीय मंत्री स्मुर्ती इराणी यांनी राष्ट्रवादीवर तोफ डागली आहे. श्रीगोंदा येथे महायुतीचे उमेदवार बबनराव पाचपुते यांच्या प्रचारासाठी श्रीगोंदा येथे आल्या होत्या. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. तसेच भाजपाला निवडून द्या असे आवाहन उपस्थितांना केले.

यावेळी बोलताना इराणी यांनी देशात भाजपाचे सरकार आहे. यानंतरही भाजपचेच सरकार येणार आहे. त्यामुळे त्यांना मतदान करुन घाटे का सौदा करु नका. त्यांचे घड्याळ बंद पडलेलं आहे. सत्तेच्या माध्यमातून जेव्हा स्वत:ची तिजोरी भरली त्याच वेळी त्यांचा खेळ संपला आहे अशी टीका त्यांनी राष्ट्रवादीवर केली आहे. देशात आणि राज्यात भाजपचेच सरकार असणे गरजेचं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने जनतेची लूट चालवली होती असंही त्या म्हणाल्या आहेत.

हे ही वाचा:-

अमेठीत शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करणारे गांधी

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here