राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे दिवाळे काढल्याशिवाय शांत बसू नका
कर्जत जामखेड मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राम शिंदे यांच्या प्रचारार्थ राशीन येथे छत्रपती उदयनराजे भोसले यांची सभा मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी शिंदे आणि उदयनराजे यांनी उपस्थित जनसमुदायास संबोधित केले.
यावेळी बोलताना उदयनराजे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने ५० वर्ष फक्त घोषणाच केल्या परंतू देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस उत्तम रितीने काम करत आहेत. राम शिंदे विकासासाठी आणि तुमच्या सेवेसाठी तत्पर आहेत आणि जनतेचा देखील त्यांना जोरदार पाठिंबा मिळतोय असं विधान केले.
पुढे बोलताना ‘कर्जत जामखेडचे पुढचे आमदार राम शिंदेच असतील, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांनी ५० वर्ष दिवाळी साजरी केली. गोरगरिबांची दिवाळी कशी होत असेल, असा विचार देखील यांच्या मनाला शिवला नाही. यंदाच्या विधानसभेला यांचं दिवाळं काढल्याशिवाय थांत बसू नका, असं उदयनराजे म्हणाले.
तसेच भाजपचे सरकार असताना स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांनी कृष्णा खोरे प्रकल्प आणला आणि नंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने त्यात पैसा खाल्ल्याची टीकाही यावेळी त्यांनी केली. दरम्यान विरोधकांना लोकांना भेटण्याचा पत्ता इथून पुढे संपर्क कार्यालय नाही तर येरवडा जेल असेल, अशी टीका सुजय विखे यांनी केली.
हे ही वाचा -:
सुनील तटकरे पक्षप्रवेशासाठी मातोश्रीभोवती घिरट्या घालत होते – आनंद गीते