राम मंदिराचा निकाल हिचं ती गोड बातमी, संजय राऊतांनी केले शांततेचे आवाहन
अयोध्येच्या राम मंदिराबाबत जो काही निकालं लागणार आहे तो आमच्यासाठी महत्वाचा आहे. अयोध्यात उद्धव ठाकरे यांनी दोनदा धडक दिली. त्यामुळे सरकारला निकाल लावण्यास मजबूर केले, असे म्हणत शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी राम मंदिराच्या निकालाबाबत भाष्य केले.
आजचा निकाल हा करडो देशवासियांच्या भावनांना आदर करणार आहे.सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च असतो त्यामुळे तो सर्वांनी मान्य करायला पाहिजे, असे राऊत म्हणाले. तसेच महाराष्ट्रमध्ये पहिले मंदिर फिर सरकार होणार आहे, असे संजय राऊत यांनी सूचक विधान केले आहे. आजचा येणार निकाल हा सरकारचा नाही, हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. त्यामुळे यामध्ये कोणतीही राजकीय बाब नाही, असेही राऊत म्हणाले.
राम मंदिर निकालाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यात शांतता आणि सलोख राखण्याचे आवाहन केले आहे.
अयोध्या खटल्याबाबत न्यायालय जो निर्णय देईल तो कोणाचेही यश किवा पराभव नसेल. देशातील सर्व नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की, देशातील शांतता, एकता आणि सद्भावनेच्या महान परंपरेला तडा जाणार नाही. ही आपली प्राथमिकता असणे आवश्यक आहे. ” असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.