राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी हालचालींना वेग धरला असून काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांच्या समन्वय समितीत किमान समान कार्यक्रमाचा मसुदा निश्चित झाला आहे. महाशिवआघाडीतील नेत्यांची बैठक नुकतीच संपली. तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी शिक्कामोर्तब केल्यानंतर तो जनतेपुढे मांडला जाईल. या ४० मुद्द्यांच्या अजेंड्यांत शेती, रोजगारनिर्मिती, दुष्काळ निवारण व उद्योगवाढीवर भर आहे. या बैठकीत ज्या मुद्य्यांवर चर्चा झाली त्या संबधीचा सविस्तर तपशील हाय कमांडला सदर केला जाईल. अशी माहिती कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांना दिली आहे.
- Advertisement -