आजही संजय राऊतांनी ट्विट करत केले भाजपाला लक्ष
राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा अजून काही सुटायला तयार नाही आहे. त्यातच शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी हे नवीन समीकरण सत्ता स्थापनेसाठी महाराष्ट्रात दिसून येणार आहे. एकीकडे राज्यपालांना भेटून भाजपा नेत्यांनी सत्ता स्थापनेसाठी आमच्याकडे पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही असे जाहीर केल्या नंतरही काल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आम्हीच सत्ता स्थापन करू असा दावा केला आहे त्यामुळे भाजपा नेत्यांमध्ये दुमत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यावर ट्विट करत पुन्हा खासदार संजय राऊतांनी भाजपाला चिमटे काढलेले आहे.
राऊतांनी आज ट्विट करताना म्हणले आहे की, ‘यारों नये मौसम ने ये एहसास किया है| याद मुझे दर्द पुराने नहीं आते – बशीर बद्र’ असे ट्विट करून त्यांनी भाजपला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. दरम्यान राज्यातील सत्ता संघर्षाचा पेच अजूनही सुटलेला नाही. या संघर्षातून शिवसेनेकडून भाजपला लक्ष्य केले जात आहे.
भाजप दिलेला शब्द पाळत नसल्याचा आरोप वारंवार शिवसेनेकडून होत आहे. तर संजय राऊतांनी एका पत्रकार परिषदेतून भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री अमित शहा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ठरलेल्या गोष्टी लपवत आहेत, असा आरोप केला जात आहे.