साध्य राज्याच्या राजकारण अनेक नव-नवीन घडामोडी घडताना दिसत आहे. एकीकडे भाजपाने बहुमत नसताना सुद्धा एकट्या अजित पवाराच्या जीवावर सत्ता स्थपन करण्याचा मानस केलेला आहे. त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. त्यामुळे सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाने एकत्र मिळून या भाजपा विरोधात मोर्चा खोलला आहे. त्यातच एक नवीन गाण्याने तर राज्यात धुमाकूळ घातलेला आहे.
एक महिन्यापासून राजकीय घडामोडी राज्यात घडताना दिसत आहे. त्यात सोशल मीडियावर सुद्धा अनेक विनोद फिरत आहे. आता “या या या आमच्या बोकांडी बसा” या गाण्याने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. कोल्हापूर येथील बेंद्रे यांनी हे गाणे लिहिले आहे. मात्र या गाण्याचा राजकीय परिस्थितीशी काहीही संबंध नसल्याचे बेंद्रे सांगत आहे. “चिरघोडी” हा आपल्याकडील पारंपरिक खेळ आहे. परंतु हे गाणं पारंपरिक असले तर सध्याच्या राजकीय परिस्थितीशी मिळते-जुळते आहे.