शिवसेना कधीही दिल्लीपुढे झुकणार नाही – उद्धव ठाकरे

शिवसेना-कधीही-दिल्लीपुढे-Shiv Sena-ever-before Delhi

शिवसेना कधीही दिल्लीपुढे झुकणार नाही – उद्धव ठाकरे

शिवसेना कधीही दिल्लीसमोर झुकणार नाही. शिवसेना सोबत होती म्हणून भाजपाचे खासदार निवडून आले आहेत. केंद्र सरकार हे राज्याचे पालक असले पाहिजे. मात्र केंद्र सरकार मदत देताना दुजाभाव करत नकारघंटा वाजवणार असेल तर शिवसेना कधीही दिल्लीसमोर झुकणार नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. सांगलीतल्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले आहे. देशाची अर्थव्यवस्था सध्या कोमात गेली आहे. ती कुणामुळे कोमात गेली आहे हेदेखील पाहिले पाहिजे असेही मत त्यांनी मांडले.

” आमचा संघ चांगलाच उत्तम आहे. संघ म्हणजे टीम, जाऊद्या नको तो वाद ” असे म्हणत त्यांनी संघालाही टोला लगावला. एवढंच नाही तर त्यांनी त्यांच्या भाषणात शेतकऱ्यांच्या मदतीचाही उल्लेख केला. शेतकरी सगळ्यात महत्त्वाचे आहेत. सध्या शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांसाठी काम करण्याची अनेक वर्षांपासूनची इच्छा आहे. आता ती इच्छा पूर्ण करण्याची संधी मला मिळाली आहे. सहकार क्षेत्र मरु देणार नाही. मात्र शेतकऱ्यांचे हित हे सर्वात आधी पाहिले गेले पाहिजे या मताचा मी आहे. २ लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी कर्जमाफी देणारच आहोत. मात्र त्यावर ज्यांचे कर्ज आहे त्यांनाही दिलासा देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत ” असेही मत मुख्यमंत्र्यांनी मांडले.

नाईट लाईफच्या माध्यमातून मुंबईत निर्माण होणार हजारो नोकऱ्या

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here