भाजपा खासदाराचे अजब वक्तव्य, वेळ पडली तर पोलिसांच्या गाड्या जाळू
सध्या भाजपा नेते आणि खासदार आपल्याच अजब वक्तव्यावरून स्वतःला आणि पक्षाला अडचणीत आणण्याचे काम करत आहेत. आता असेच आणखी एक वादग्रस्त वक्तव्य भाजपाचे पश्चिम बंगाल येथील खासदार सौमित्र खान यांनी केलेले आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये पोलिसांनी मध्यस्थी केली तर गरज पडल्यास पोलिसांच्या गाड्या जाळू असे वक्तव्य खान यांनी केलेले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे सर्व स्थरातून त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे.
सैमित्र खान हे पश्चिम बंगाल मधील विष्णूपूर लोकसभा मतदार संघाचे खासदार आहे. या आधी त्यांनी NCR आणि CAA कायद्याला विरोध करणाऱ्या ममता बॅनर्जी यांचा कुत्रा म्हणून उल्लेख केला होता. मंगळवारी सुद्धा त्यांनी तृणमूल काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्त्यावर होणाऱ्या पोलिसांच्या हल्ल्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. जर माझ्या मतदार संघात तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांना मारले तर त्यांना काळे-पिवळे होई पर्यंत मारले जाईल अशी धमकी खान यांनी दिलेली आहे.