आपल्याच वक्तव्यामुळे मिसेस फडणवीस झाल्या सोशल मीडियावर ट्रोल

 

(फोटो सौजन्य : व्हायरल गप्पा)                

               अमृता फडणवीस सध्या भाजपाची सत्ता गेल्यापासून आणि फडणवीसांना दीड दिवसात मुख्यमंत्री पदावरून पायउतारा व्हावे लागल्यामुळे मिसेस फडणवीस शिवसेना पक्षावर ट्विटरच्या माध्यमातून सतत टीका करताना दिसतात. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना विरोधात केलेल्या वक्तव्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना जोरदार टोला लगावला होता. या टोल्यानंतर अस्वस्थ झालेल्या मिसेस फडणवीसांनी पुन्हा ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर टीका केली होती. परंतु ह्याच टीकेमुळे मिसेस फडणवीस ट्रॉल होऊ लागलाय आहे.

                त्यांच्या या ट्विटनंतर सोशल मीडियाच्या मध्यामातून फडणवीसांना ट्रोल करण्यात आलेले आहे. “रेशमी किडा कार्य करत राहतो दुसऱ्यांना आनंदी करतो. सुलेमानी किडा नुसती ढवळा-ढवळ करण्यात गुंग असतो”, “सगळे किडे परवडले पण आवाज नसताना गाणी म्हणण्याचा किडा सर्वात वाईट” , ” माणसात दम नसला तर नवरे बायकोला पुढे करतात हा त्यातलाच एक प्रकार नाही ना” , “या दोघांनाही नागपूरच्या मेंटल हॉस्पिटल मध्ये भरती करायला पाहिजे ते पण सरकारी खर्चाने, नाही तर दगड मारत फिरायला वेळ लागणार नाही यांना” अशा कमेंटचा भडीमार होत होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here