“देवेंद्र फडणवीस अमृता वहिनींना आवरा” – किशोर तिवारी

देवेंद्र-फडणवीस-अमृता-वह-Devendra-Fadnavis-Amrita-He

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तसेच राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापनेनंतर माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणीवसांनी शिवसेना पक्षावर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. सध्या सत्तेतून पाय-उतार झाल्यामुळे फडणवीसांना जोरदार धक्का पोहचला आहे. त्याचबरोबर मिसेस फडणवीसांनी सुद्धा ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर बोचरी टीका करणे चालूच ठेवले आहे.

आता या प्रकरणी वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी थेट संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांना पत्र लिहून फडणवीस दांपत्याला आवर घाला, अशी विनंती केली आहे. किशोर तिवारींनी भैय्याजी जोशी यांना पत्रातून देवेंद्र आणि अमृता फडणवीस यांनी केलेल्या टीकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “देवेंद्र आणि अमृता फडणवीस यांना आवर घाला, अमृता यांचा राजकीय हस्तक्षेप थांबवा”, अशी विनंती तिवारी यांनी केली आहे.सेच देवेंद्र आणि अमृता यांच्या उर्मटपणामुळे, शिवसेना आणि भाजपची युती होऊ शकली नाही, अशी नाराजीही त्यांनी या पत्रात व्यक्त केली. तिवारी हे वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष आहेत.

देवेंद्र आणि अमृता फडणवीस हे शिवसेनेवर ज्या प्रकारे टीका करत आहे, त्यामुळे हिंदू पक्ष दुरावत आहेत. ते जवळ येणं आणखी कठीण होत आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती होऊ शकली नाही आणि भाजपला सत्तेतून बाहेर पडावे लागले होते. हे सगळं फडणवीसांच्या अरेरावीमुळे घडलंय, अशा शब्दात तिवारींनी तक्रार केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here