भाजपातले दानवे काही शुद्ध तुपातली आहे का ? – बच्चू कडू
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचनालयाने मंगळवारी सकाळी धाड टाकली होती. आमदार सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयावर देखील छापा टाकण्यात आला होता. तसेच त्यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विंहग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचे पथक पोहोचले होते. त्यात सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहे. यावर आता राज्यमंत्री बच्चू कडून यांनी जोरदार टीका केली आहे.
तुम्ही अनेकांची ईडी चौकशी लावली परंतु भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे काही शुद्ध तुपातले आहे का, अशी जोरदार टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे. तसेच राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्याची ईडीने चौकशी केल्यास मोठं घबाड उघडकीस येईल असही राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बोलू दाखविले.
भाजप नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर संपती गोळा केली असून सुद्धा एकाही भाजप नेत्यांवर ईडीची चौकशी लागत नाही. तुम्ही पक्षपातीपणा करत नाही तर मग भाजपच्या एकाही नेत्यावर ईडीची चौकशी का लागत नाही, असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे.