शेतकऱ्यांच्या हिंसक आंदोलनाला मोदी सरकार जबाबदार – पृथ्वीराज चव्हाण
शेतकरी आणि पोलीस यांच्यात झालेल्या वादानंतर आता आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱ्या रंगल्या आहेत. ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागल्यानंतर शेतकऱ्यांनी लालकिल्ल्यावर निशाण ए साहिब ध्वज फडकवला होता. त्यावरून बरंच वादंग सुरू झाले होते. यावर आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले आहे.
दिल्ली येथे सुरु असलेले शेतकऱ्यांचं आंदोलन हिंसक होण्याला संपूर्णपणे मोदी सरकार जबाबदार आहे. त्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांना हे टोकाचे पाऊल उचलावे लागले आहे. या मुर्दाड मोदी सरकारला जाग केव्हा येणार असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी विचारला आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी कृषी कायदे रद्द व्हावे म्हणून शेतकरी केंद्र सरकारकडे विनवणी करत आहे. मात्र सरकारकडे यांच्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आवळला होता अशी टीका चव्हाण यांनी केली आहे.