रविवार दि. २३ जुलैचा दिवस भारतीय महिला क्रिकेटसाठी खूप महत्वाचा होता. महिला क्रिकेट वर्ल्डकप मध्ये भारतीय संघ चार सामने जिंकून उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया सारख्या संघाला हरवून अंतिम फेरी मध्ये पोचला होता आणि अंतिम फेरीत त्या दृष्टीने भारतीय संघाने प्रयत्न केले सुद्धा पण शेवटी संघाला पराभव स्वीकारावा लागला. त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक अनेक सेलेब्रेटींनी ट्विटरच्याच्या माध्यमातून केले. भारतीय महिला संघ जरी अंतिम फेरीत पराभूत झाला असला तरी संघाच्या कामगिरी मुळे देशात महिला क्रिकेट चे स्थान उंचावले आहे.
- Advertisement -