भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनेच टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अखेरीस बाजी मारली आहे. विराटने मोहालीच्या मैदानावर रोहित शर्माला मागे टाकत सर्वाधिक धावा पटकावणारा फलंदाज असा बहुमान मिळवला होता. रोहितला हा विक्रम पुन्हा आपल्या नावे करण्यासाठी रविवारी बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानावर ८ धावांची गरज होती. ९ धावा काढत हा विक्रम रोहितने आपल्या नावे जमाही केला. पण रोहित ९ धावा काढून हेंड्रिग्जच्या गोलंदाजीवर माघारी परतला.
- Advertisement -