२०१९-२० मध्ये सुमारे १६ लाख नव्या नोकऱ्या घटणार
एसबीआयने आर्थिक सुस्तीचे चिंताजनक चित्र दाखवले आहे. बँकेच्या मुख्य आर्थिक सल्लागार डाॅ. साैम्याकांती घाेष यांच्या अहवालानुसार २०१९-२० मध्ये सुमारे १६ लाख नव्या नोकऱ्या घटणार आहेत. २०१८-१९ मध्ये एकूण ८९.७ लाख नव्या नोकऱ्या मिळाल्या होत्या. एप्रिल-ऑक्टोबर २०१९ पर्यंत ४३.१ लाख नव्या नोकऱ्यांचे सृजन झाले. वर्षभरासाठी त्याची सरासरी ७३.९ लाख आहे. तसेच यंदा सरकारी नोकऱ्याही ३९ हजारांनी कमी राहण्याचा अंदाज आहे. नवी दिल्ली – डिसेंबरमध्ये किरकोळ महागाई दर ७.३५% वर पोहोचला. हा साडेपाच वर्षांचा उच्चांक आहे.
यापूर्वी जुलै २०१४ मध्ये तो सर्वाधिक ७.३९% झाला होता. खाद्यपदार्थ विशेषकरून कांदा दहापट महागल्याने महागाई दर वधारला. डिसेंबर २०१८ च्या तुलनेत डिसेंबर २०१९ मध्ये भाजीपाला ६०.५% महागला. खाद्यपदार्थांच्या महागाईचा दर १४.१२% होता. तो डिसेंबर २०१८ मध्ये -२.६५% होता.
परराज्यात नोकरी करणारे चाकरमानी आपल्या घरी कमी पैसे पाठवत आहेत. दिवाळखोरी प्रक्रियेच्या निकालांत विलंबाने कंपन्या कामगारांच्या संख्येत मोठी कपात करत आहेत. पगारवाढीवरही संक्रांत ५ वर्षांत उत्पादकता वृद्धी दर ९.४% ते ९.९% दरम्यान राहिला. यामुळे यंदा कमी पगारवाढीची शंका आहे. यामुळे काॅर्पाेरेशन्स व इतर ग्राहक गरज नसतानाही कर्जे उचलू शकतात. ब्लूमबर्गनुसार बेराेजगारी दर ४५ वर्षांच्या उच्चांकावर आहे. घटत्या रोजगारांमुळे सरकारवर दबाव वाढेल. २०१८ मध्ये १२ हजारांवर बेराेजगारांनी आत्महत्या केली होती.