भाजपाच्या आरोपाला आमदार मनीषा कायंदे यांचे जोरदार प्रतिउत्तर
काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गौप्यस्फोटानंतर शिवसेनेचा खरा चेहरा समोर आला अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. यालाच शिवसेना प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव साहेबांच्या नेतृत्वात शिवसेना पक्षाने जे केले ते खुलेआम केले. आपल्याच सहकारी पक्षातील लोकांचे आणि आपल्याच पक्षातील नेत्यांचे छुप्या पद्धतीने खच्चीकरण करण्याचे कारनामे कधी उद्धव ठाकरेंनी केले नाहीत, अस म्हणत फडणवीसांना जोरदार टोला लगावला आहे.
गोरेगावात विध्यार्थ्यांना प्रेरणा देणारे भिंत्तीशिल्पाचे देसाई यांच्या हस्ते अनावरण
भाजपा जर पूर्ण बहुमतात सत्तेत आल्यावर शिवसेनेचे खच्चीकरण करू पाहत आहे हे लक्षात आल्यावर शिवसेनेनं आपला स्वतंत्र बाणा जपून राजकीय सोयरीक करण्याचा प्रयत्न केला असला तर त्यात वावगं काय?, असा सवाल कायंदे यांनी फडणवीसांनी केला आहे. दरम्यान, भाजप, शिवसेना जेव्हा वेगवेगळे लढले तेव्हाही शक्तीमान भाजपला बहुमत मिळाले नव्हतंच. केवळ १२२ आमदारांच्या जोरावर तेव्हा आपण सत्ता स्थापन केली तेव्हा कोणते अदृ्ष्य हात आपल्या मागे होते ते सांगा, असा प्रश्न मनीषा कायंदे यांनी उपस्थित केलेला आहे.