CAA आणि NCR विरोधात भारत मुक्ती मोर्चाकडून भारत बंदची हाक
देशात सीएए आणि एनआरसी विरोधात वातावरण तापले आहे. त्यातच आज बहुजन क्रांती मोर्चातर्फे आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. मोर्चाने नागरिकत्व दुरुस्ती कायदा, राष्ट्रीय नागरकत्व नोंदणी आणि ईव्हीएमविरोधात हि हाक दिली असून व्यापारी, दुकानदार, शैक्षणिक संस्था, नागरिकांनी या भारत बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन संगटनेकडून करण्यात आलेले आहे.
बहुजन क्रांती मोर्चाच्या या भारत बंदला शाहीन बागमधील आंदोलक महिलांनाही पाठिंबा दिला आहे. आजच्या बंदच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. त्यासाठी सर्व जिल्ह्यांना अलर्टही जारी करण्यात आला असून संवेदनशील भागांमध्ये विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. बहुजन क्रांती मोर्चाच्या या भारत बंदला एनआरसी-सीएएचा विरोध करणाऱ्या इतर संघटनांचाही पाठिंबा मिळू शकतो. अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.