थकीत पाणीबिल भरण्याची मुदत डिसेंबरपर्यंत ! ; मंत्री आदित्य ठाकरे यांचे ट्विट.

आदित्य-ठाकरे-यांच्यात-का- Aditya-Thackeray-Between-Why

थकीत पाणीबिल भरण्याची मुदत डिसेंबरपर्यंत ! ; मंत्री आदित्य ठाकरे यांचे ट्विट.

मुंबईचे माजी महापौर सुनील प्रभू यांनी थकीत पाणीबिल भरण्यासाठी असलेल्या अभय योजनेची मुदत डिसेंबर २०२० पर्यंत वाढवण्याची मागणी पर्यावरण मंत्री आणि मुंबईचे उपजिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली होती. या मागणीला आदित्य ठाकरे यांनी हिरवा कंदील दिला आहे. या निर्णयामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबईकरांचे थकीत पाणी बिल भरण्यासाठी असलेल्या अभय योजनेची मुदत १२ ऑगस्ट २०२० रोजी संपत आहे. ही मुदत वाढवून मिळावी अशी मागणी शिवसेना आमदार तथा माजी महापौर सुनील प्रभु यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली होती. या मागीणीला होकार देत मंत्री आदित्य ठाकरे यांनी मनपा आयुक्तांशी चर्चा करून मुदत ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वाढवलेली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here