Skip to content Skip to footer

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील १२४ पदे तातडीने भरणार – गुलाबराव पाटील

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील गेल्या अनेक वर्षपासून रखडलेल्या अनुकंपा तत्वातील पदांची भरती करण्याचा मार्ग मंत्री गुलाबराव पाटील यांनी खुला केला असून गट – क व गट – ड मधील विविध संवर्गातील १२४ पदांची भरती करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे आदेश पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहे.

मार्च २०१२ च्या शासन नियमानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या लिपिक – टंकलेखक पदभरतीवरील निर्बंध शिथिल करून गट क मधील लिपिक आणि टंकलेखक यांच्या एकूण रिक्त पदांच्या १० टक्के पदावर अनुकंपा तत्वावर नियुक्ती करण्यास मंजुरी देण्यात आली. ऑगस्ट २०१६ रोजी झालेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संचालक मंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार मार्च २०१२ च्या शासन निर्णयातील तरतुदीमध्ये नमूद केल्यानुसार लिपिक टंकलेखकांची ११ पदे भरण्यात आली.

पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने ऑक्टोबर २०१८ अन्वये मान्यता दिल्यानुसार वर्ग ३ व वर्ग ४ ची एकूण १५ पदे भरण्यात आली आहेत. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या ऑक्टोबर २०१९ अन्वये सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय जून २०१९ च्या शासन निर्णयानुसार वर्ग ३ व वर्ग ४ ची एकूण १५ पदे भरण्यात आली.

Leave a comment

0.0/5