Skip to content Skip to footer

संभाजी नगर वादावर अबू आझमी यांच्याशी चर्चा करू – संजय राऊत

संभाजी नगर वादावर अबू आझमी यांच्याशी चर्चा करू – संजय राऊत

समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी एका व्हिडीओद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आवाहन केले आहे. शहरांची नावे बदलून कुणाचे पोट भरत नाही. शहरांना आवडीचं नाव ठेवायचंच असेल, तर नवी शहरं वसवून ठेवा असे आझमी यांनी आपल्या व्हिडिओच्या माद्यमातून मुख्यमंत्री ठाकरे यांना आवाहन केले आहे. यावर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.

समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचा संभाजीनगरला काही विरोध असेल असं वाटत नाही. त्यांनी राम मंदिरालाही विरोध केला नव्हता. ते समजूतदार नेते आहेत, आम्ही त्यांच्याशी चर्चा करु, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

अहमदनगर किंवा औरंगाबादला एक इतिहास आहे. तो बदलून जबरदस्तीने नामांतर करणं योग्य नाही. नामांतर करायचंच असेल, तर आधी महाराष्ट्राचे नाव बदलून राज्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्या. रायगडचे नाव बदलून संभाजी महाराजांचं नाव द्या. लोकांनाही ते आवडेल. मात्र, केवळ काही लोकांना डिवचण्यासाठी नामांतर करणं हे आपल्याला शोभत नाही असे मत आझमी यांनी मांडले होते.

Leave a comment

0.0/5