Skip to content Skip to footer

सिद्धिविनायक मंदिर न्यास पुरग्रस्थ भागाला पुरवणार पिण्याचे पाणी…

सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून कोल्हापूर, सांगली आणि सातारा या पुरग्रस्थ भागात पिण्याचे शुद्ध पाणी पुरवण्यात येणार आहे. एका ट्रक मध्ये एक लिटरच्या १० हजार बाटल्या बसतील असे १०० ट्रक रवाना करण्यात येणार आहे. अशा प्रकारे १०,००० हजार लिटर पाण्याच्या बाटल्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. असा निर्णय पुरग्रस्थांना मदत करण्याच्या बैठकित घेण्यात आलेला आहे.

पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशा नुसार पश्चिम महाराष्ट्रातील पुरग्रस्थांना सर्वोतोपरी मदत करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मुख्यमंत्र्यांकडून ही आमच्या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळालेला असून कोल्हापूर सांगलीतील जिलाधिकर्त्यांशी संवाद साधून लवकरात लवकर मदत पोहचवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे अशी माहिती अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिलेली आहे.

Leave a comment

0.0/5