शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची ‘जनआशीर्वाद’ यात्रा बुधवार २८ ऑगस्ट रोजी यवतमाळ जिल्ह्यात येत आहे. या यात्रेनिमित्त नेर येथे शेतकऱ्यांशी भेट,स्वागत, यवतमाळ येथे ‘आदित्य संवाद’ व दारव्हा येथे शिवसेना विजय संकल्प मेळावा इत्यादी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात आदित्य ठाकरे शेतकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती शिवसेना यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने आज आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
२८ ऑगस्टला अमरावती मार्गे सकाळी ११ वाजता नेर येथे जनआशीर्वाद यात्रेचे आगमन होणार आहे. याठिकाणी शिवसेनेच्या वतीने पारंपरिक पद्धतीने स्वागत झाल्यानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे परिसरातील शेतकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.