सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन देशभरात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून आंदोलनं केली जात आहेत. या संदर्भात स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल आर खानने ट्विट करत देशातील मुस्लिमांना आवाहन केले आहे. सध्या त्याचे ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले असून अनेकजण त्यावर प्रतिक्रिया देत आहेत.
‘मी सर्व मुस्लीम बांधवांना विनंती करतो की त्यांनी आरएसएसने मुस्लिमांसोबत हे केले आहे आणि पोलिसांनी मुस्लिमांसोबत ते केले आहे असे मेसेजेस व्हॉट्स अॅपवर पाठवणे बंद करावे. तुम्ही हे सर्व करुन मुस्लिमांना मदत करण्याऐवजी त्यांच्या अडचणी वाढवत आहात. त्यामुळे कृपया शांतता राखा’ असे ट्विट करत कमालने मुस्लिमांना आवाहन केले आहे.