मुंबईच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात डॉक्टरांचा टास्कफोर्स – मुख्यमंत्री.
कोरोनाशी आपण तीन महिन्यांपासून लढतो आहोत. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग आपण चांगल्या पद्धतीने रोखला असला तरी, मृत्यूदर वाढणे बरोबर नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देताना मृत्यू दर रोखणे महत्त्वाचे असून, रुग्णांचे संपर्क शोधण्यात अजिबात ढिलाई नको, अशी सक्त ताकीद दिली आहे.
आपण लॉकडाऊन शिथिल केला आहे, त्यामुळे रुग्णांच्या संख्येत काही जिल्ह्यांत वाढ होत आहे. रुग्ण शोधणे आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क जलदरित्या शोधणे हा एकमेव मार्ग आहे. या कामांत अजिबात ढिलाई नको, असे सांगतांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये तेथील तज्ज्ञ डॉक्टर्सचे टास्क फोर्स नेमावे, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगर पालिका आयुक्त यांच्याकडून कोरोना परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. त्यावेळी हे निर्देश दिलेत. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील सहभागी या बैठकीस होते. मुंबई येथे डॉक्टर्सचा टास्क फोर्स आपण स्थापन केली. त्याचा चांगला उपयोग झाला.