नागपूर जिंका आले नाही आणि बारामतीवर डोळा फडणवीस झाले ट्रोल
राज्यात लागलेल्या जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निकालात अक्षरशः भाजपाला अनेक ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला. यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्हा परिषदेत आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत पक्षाची पीछेहाट होत राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना पक्षाने बाजी मारलेली आहे. या निकालानंतर नागपूर मधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला तर नागपूर भाजपा कार्यलयाच्या बाहेर शांतता पसरलेली होती. या निकालानंतर नेटकऱ्यांनी भाजपा आणि फडणवीसांना ट्रोल केले आहे.
नागपूर या भाजपाच्या बालेकिल्ल्यामध्ये भाजपाचा दारुण पराभव झाल्याने अनेकांनी फडणवीस यांना ट्रोल केले आहे. फडणवीस आणि भाजपा यांना टोमणे मारणाऱ्या अनेक कमेंट्स या पोस्टवर दिसून येत आहेत. काहींनी फडणवीस आता नागपूरातही विरोधीपक्षातच बसणार असा टोला लगावला आहे तर काहींनी भाजपा केवळ आकडेवारीमध्येच अडकून असल्याची टीका केली आहे. अनेकांनी या पोस्टवर ‘नागपूरमध्ये काय झालं ते सांगा’ असा सवाल फडणवीस यांना केला आहे. तर काहींनी थेट ‘नागपूर जिंकता येत नाही आणि हे बारामती जिंकण्याच्या गोष्टी करत होते,’ असं म्हणत फडणवीस यांच्या या स्ट्राइक रेटचा समाचार घेतला आहे.