Skip to content Skip to footer

शेतकरी आंदोलनात चीन आणि पाकिस्तान देशाचा हात मंत्री रावसाहेब दानवे यांचा जगावेगळा दावा

शेतकरी आंदोलनात चीन आणि पाकिस्तान देशाचा हात मंत्री रावसाहेब दानवे यांचा जगावेगळा दावा

देशभरात शेतकरी कृषी कायद्याविरोधात जोरदार आंदोलन सुरु झाले आहे. मंगळवारी शेतकरी कायद्याविरोधात विविध संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. देशात लागू केलेले कृषी कायदे रद्द करावे यासाठी मागच्या १२-१४ दिवसांपासून शेतकरी राजधानी दिल्ली येथे आंदोलन करत आहे. या बंदला राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने आपला पाठिंबा दर्शविला होता. तसेच या बंद व आंदोलनाबद्दल विविध चर्चा होत असतानाच आता भाजपा नेते आणि केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे.
. शेतकरी आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असून चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. हे शेतकऱ्यांचे आंदोलन नाही असेही त्यांनी बोलून दाखविले होते. पत्रकार माध्यमांशी बोलताना हा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.

यावर बोलताना दानवे म्हणाले की, हे जे आंदोलन चालू आहे. हे शेतकऱ्यांचं आंदोलन नाही. याच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. या देशामध्ये पहिल्यांदा मुस्लीम समाजाला उचकवलं आणि सांगितलं सीएए आणि एनआरसीमुळे मुस्लिमांना देशातून बाहेर जावं लागेल. एखादा तरी मुसलमान बाहेर गेला का? अशी विचारणा त्यांनी केली. आता त्यांच्या विधानावर विरोधक काय उत्तर देतात हे पाहावे लागणार आहे.

Leave a comment

0.0/5